Category: उद्योजक

  • फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

    फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

    मारिया कुरियोकोस ही मुळची केरळच्या त्रिशुरची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती स्पेनला शिकायला गेली. 2017 मध्ये तिला नोकरी लागली; पण 2019 मध्ये तिने नोकरी सोडून दिली. तिला स्वतःच असं काहीतरी करायचं होत. थोडं संशोधन केल्यावर तिला समजलं, की लोकं नारळाच्या कवट्या फेकून देतात; पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनू शकतात. मग तिने नारळाच्या कवट्या Recycle करायला सुरुवात केली आणि त्यापासून सजावटीचे सामान बनवले.

    2019 मध्ये मारियाने Thenga Coco नावाने व्यवसाय सुरू केला. ती नारळाच्या कवट्या रिसायकल करून त्यापासून बाऊल, कँडल होल्डर तसेच प्लांट हँगर्स अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवते.

    सुरूवातीला तिने 150 किचन बाऊल बनवले. ते एका इव्हेंटमध्ये तसेच तिच्या मित्रपरिवाराला विकले. 60 रुपयाला एक बाऊल असा व्यवसाय तिने सुरुवातीला केला. त्यातून तिला 9000 रुपये मिळाले. मग तिने 1500 रुपयांची ड्रिलिंग मशीन घेतली. एकूण 4000 गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केल्याचं मारिया सांगते. आता तिच्याकडे महिला कामाला आहेत ज्या तिला हे प्रोडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविड-19 मध्ये तिने तिचा व्यवसाय ऑनलाईन नेला, तेव्हा तिच्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यांचे जास्त ग्राहक हे मुंबई, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरातून आहेत, जिथे लोकं इकोफ्रेंडली प्रोडक्ट्सबद्दल जास्त जागरूक आहेत.

    तसेच ती आता युरोप, अमेरिकेतसुध्दा आपले प्रोडक्ट्स निर्यात करते. तिला विदेशातूनदेखील अनेक ऑर्डर्स मिळतात.

    पहिल्या वर्षी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपये होता, तर दुसऱ्या वर्षी तो 50 लाख रुपये इतका झाला. मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा टर्नओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. 

    Thenga Coco : 

    Thenga Coco हा केरळमधील एक स्वदेशी ब्रँड आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होतो. या ब्रँडमध्ये कचरा मानला जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांवर पुनर्प्रक्रिया व त्याचे पुनरुत्पादन केले जाते. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. याशिवाय, कंपनी भविष्यात नारळाच्या कवट्यांपासून खेळणी आणि दागिने तयार करण्याचा विचार करत आहे, जे प्लास्टिकच्या खेळण्यांना सुरक्षित पर्याय ठरू शकतात. 

    1200

    थेंगा कोकोचे उत्पादन केवळ पर्यावरणपूरक नसून, हे महिलांना आर्थिक स्वावलंबनही प्रदान करते. कंपनीत 80% कर्मचारी महिला आहेत आणि त्यांच्या हातांनी ह्या वस्तू तयार केल्या जातात. ही उत्पादने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीत 18 कर्मचारी आहेत, त्यातील 12 महिला असून, त्यांना लवचिक कामाच्या वेळा दिल्या जातात जेणेकरून त्या घरगुती जबाबदाऱ्यांसह काम करू शकतील.

    आणखी वाचा :

  • भारतीय विमान सेवेचे जनक, उद्योगरत्न जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस

    भारतीय विमान सेवेचे जनक, उद्योगरत्न जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस

    JRD TATA 1
    JRD TATA 2
    ओळख
    जेआरडी यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी रतन दादाभॉय व सूनी टाटा यांच्या पोटी पॅरिस येथे झाला. ते टाटा ग्रुपचे चौथे अध्यक्ष होते.
    JRD TATA 3
    शिक्षण
    जेआरडींचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. तर शिक्षण लंडन, जपान, फ्रान्स आणि भारतात झालं. त्यांना केंब्रिजमधून इंजिनिअरिंग करायची इच्छा होती, पण वडिलांनी व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात बोलावून घेतलं.
    JRD TATA 4
    सुरुवात
    बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून त्यांनी कंपनीत कामाला सुरुवात केली.

    वयाच्या 22 व्या वर्षी ते टाटा सन्सचे डायरेक्टर बनले, तर 34 व्या वर्षी कंपनीचे चेअरमन बनले.
    JRD TATA 5
    विमान वाहतुकीचे जनक
    भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक म्हणून जेआरडी ओळखले जातात. ते भारताचे पहिले कमर्शिअल पायलट होते. कराची ते मुंबई
    हे पहिलं विमान त्यांनी स्वतः उडवलं होतं. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स स्थापना केली. ज्याचं नाव नंतर एअर इंडिया झालं.
    JRD TATA 6 1
    टाटा ग्रुपचा विस्तार
    जेआरडी अध्यक्ष झाले तेव्हा टाटांच्या 14 कंपन्या होत्या. निवृत्तीच्या वेळेस ही संख्या 95 पर्यंत पोहोचली. ग्रुपचा महसूल 100 दशलक्ष डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. टीसीएस, टायटन, टाटा मोटर्स, वोल्टास, एअर इंडिया इत्यादी कंपन्या जेआरडींच्याच काळात सुरु झाल्या.
    JRD TATA 7 1
    समाजकल्याण
    त्यांनी कामगारांसाठी दिवसात 8 तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा योजना सुरु केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल इत्यादी संस्था स्थापना करण्यात भूमिका बजावली.
    JRD TATA 8
    पुरस्कार
    जेआरडी हे पहिले आणि एकमेव उद्योगपती आहेत, ज्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा त्यांना दिला गेला. भारतीय हवाई दलातील एअर व्हाईस मार्शल हे मानद पद त्यांना देण्यात आले होते. हवाई क्षेत्रातील
    JRD TATA 9
    देशातील सामान्य लोकांचा आणि देशाचा जोपर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत
    एक उद्योजक म्हणून मिळणारे कोणतेही यश अपूर्ण आहे.
    – जेआरडी टाटा