Category: विज्ञान आणि तंत्रज्ञान

  • इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

    इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

    कोण आहेत ते चार अंतराळवीर?

    गगनयान मोहिमेअंतर्गत भारताचे अंतराळवीर स्वतःच्या बळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये तब्बल ६ टन वजनाचे अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. या यानाची क्षमता ४ अंतराळवीर सामावतील इतकी असणार आहे. विशेष म्हणजे, हे यान पृथ्वीपासून तब्बल ४०० किमी अंतरावर ३ दिवस प्रदक्षिणा घालेल, असे गगनयान मोहिमेचे नियोजन असेल.

    GHVfR03WIAAtm4h

    अशात या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या चार अंतराळवीरांची नावेही समोर आली आहेत. त्यात ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. हे चारही वैमानिक बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. इतकंच नव्हे, तर रशियात या चौघांनीही काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक असलेले प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चारही वैमानिकांना ऍस्ट्रोनॉट विंग्स (अंतराळवीर पंख) देऊन जगापुढे सादर केले. तसेच, त्यांना पुढील तयारीसाठी शुभेच्छाही दिल्या.

    देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव

    या चारही वैमानिकांबाबत महत्त्वाची बाब अशी की, त्यांनी देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. या चौघांनीही प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानांची सखोल माहिती आत्मसात केली आहे. त्यांनी विमानांची वैशिष्ट्ये आणि कमतरता यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ज्ञान समृद्ध केले आहे. त्यामुळे या चौघांची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

    राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर

    यापूर्वी एप्रिल १९८४ मध्ये राकेश शर्मा हे तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या Soyuz-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर बनले होते. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी इतर देशांचे प्रतिनिधित्व करत अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली होती.

    1692899737 Rakesh Sharma 2

    मात्र, आतापर्यंत भारताला स्वत:च्या बळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवता आला नव्हता. त्यामुळे आता देशाचे चारही अंतराळवीर पुढील वर्षी म्हणजेच २०२५च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेतून अवकाश वारी करतील.

  • Chat GPTला टक्कर देणार देसी ‘हनुमान’, मार्चमध्येच लाँच होणार 11 भाषेत काम करणारा अंबानींचा AI मॉडेल

    Chat GPTला टक्कर देणार देसी ‘हनुमान’, मार्चमध्येच लाँच होणार 11 भाषेत काम करणारा अंबानींचा AI मॉडेल

    पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देसी AI टूल हनुमान (Hanooman) लाँच केले जाणार आहे. त्यामुळे Hanooman ChatGPT शी जोरदार टक्कर असेल. कारण, ChatGPT प्रीमिअम सेवांसाठी जास्त पैसे चार्ज करते, तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स ग्रूपचे चेअरमन मुकेश अंबानी ही सेवा स्वस्त दरात किंवा मोफतही उपलब्ध करून देऊ शकतात.

    काय आहे ‘हनुमान’ AI मॉडेल?

    मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयआयटी मुंबई सोबत इतर ७ आघाडीच्या इंजिनीअरिंग संस्थांच्या प्रयत्नातून एक देसी AI मॉडेल बनवण्यात आले आहे. या AI मॉडेलचे नाव हनुमान ठेवण्यात आले आहे. BharatGPT संस्थेच्या लोकांनी मुंबईतील एका तंत्रज्ञान संम्मेलनात हनुमान AI लँग्वेज मॉडेल सादर केले. हनुमान AI मॉडेलची सेवा पुढील महिन्यापासून सुरू होईल.

    368b5ae7310b2cb74b6b985a751be486

    यादरम्यान एक बाईक मेकॅनिकला AI मॉडेलसह तमिळ भाषेत प्रश्न विचारताना दाखवले गेले. तसेच, एका बँकरला AI बॉटसोबत हिंदी भाषेत संवाद साधताना पाहिले गेले. यासोबतच एका डेव्हलपरने AI मॉडेलच्या मदतीने कम्प्यूटर कोडही लिहिला.

    का आहे खास?

    हनुमान AI मॉडेल ११ स्थानिक भाषांमध्ये काम करण्यास सक्षम असेल. हनुमान AI मॉडेल, शासन, आरोग्य, शिक्षण आणि वित्त सेवांसारख्या प्रमुख 4 क्षेत्रांना प्राथमिकता देऊन आपल्या सेवा पुरवेल. हे मॉडेल शासन, मॉडेल आरोग्य, शिक्षण आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांसाठी डिझाईन केले गेले आहे. जर हे मॉडेल यशस्वी ठरले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात रिलायन्स मोठा प्लेअर म्हणून समोर येईल. हनुमान AI मॉडेल (Hanooman AI Model) भारतीय धर्मग्रंथापासून प्रेरित आहे. जिओकडून इतर अनेक AI मॉडेल जसे की, जिओ ब्रेनवरही काम सुरू आहे.

    bharat gpt ai 107911740

    LLM आहे तरी काय?

    हनुमान AI मॉडेल स्पीच टू टेक्स्ट यासारख्या युजर फ्रेंडली सेवा देईल. हे एक मोठे लँग्वेज मॉडेल किंवा LLM (Large Language Model) सिस्टीम आहे, जी मोठ्या प्रमाणात डेटाचा वापर करून शिकते आणि नैसर्गिक साऊंड रिस्पॉन्स जनरेट करते. असे मॉडेल जनरेटिव्ह AI चा वापर करतात, जी एक नवीन प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. भारताचे हे मॉडेल आगामी काळात OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देईल.

    img blog 2 4

    हे मॉडेल यशस्वी झाले, तर हे AI तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत भारताचा मार्ग मोकळा करेल. मागील वर्षीच्या एका कार्यक्रमादरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान IIT Bombay सोबत एका प्रोजेक्टवर सन २०१४ पासून काम करण्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जिओ २.० सोबत BharatGPT चीही सुरुवात केली जाईल. अशाप्रकारे, सर्वांनाच या मॉडेलची आतुरता लागली आहे.

    आणखी वाचा

  • कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    आपल्या सगळ्यांच्याच घरात रिमोटवर चालणारे टीव्ही, आपल्या हातात असलेला स्मार्टफोन, किंवा कार चालवताना मिळणारे मार्गदर्शन, या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आत्ताच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या सहजपणे रुतले गेलेलं हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे. सर्वप्रथम, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर, संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची, समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी विविध तंत्रज्ञानं वापरली जातात, जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नेटवर्क थिअरी इत्यादी.

    ai

    कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास खूप जुना नाही. १९५० च्या दशकात या संकल्पनेवर पहिली चर्चा झाली. पण त्यावेळी संगणक तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते, त्यामुळे ही संकल्पना तशीच राहिली. संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर 1990 च्या दशकात त्यावर पुन्हा संशोधन सुरु झालं. आता या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. आज robots पासून ते स्वयंचलित गाड्यांपर्यंत, AI सर्वत्र आपले अस्तित्व दाखवत आहे. आत्ता आपण वापरत असलेले Google Assistant किंवा Siri सारखे व्हॉइस असिस्टंट्स, सोशल मीडियावरील व्यक्तिगत पसंतीनुसार दिसणाऱ्या जाहीरती, तुमच्या आवडीनुसार शिफारसी देणारे ऑनलाइन स्टोअर्स हे सगळं AI चीच उदाहरण आहेत.

    आज आपण अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पाहतो आहोत, जसे की-

    • वैद्यकीय क्षेत्रात: आजारांचं निदान, औषधांचा शोध, शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींमध्ये
    • वित्तीय क्षेत्रात: धोका ओळखणं, गुंतवणूक सल्लागार, फसवणूक रोखणे इत्यादी गोष्टींसाठी
    • वाहतूक क्षेत्रात: स्वयंचलित वाहनं, वाहतूक नियंत्रण, अपघात टाळणे इत्यादी गोष्टींसाठी
    • ग्राहक सेवा: चॅटबॉट्स, कस्टमर केअर, वैयक्तिकृत जाहिराती (personalized ads) इत्यादी गोष्टींसाठी

    भविष्य काय:

    AI ची वाटचाल खऱ्या अर्थाने आत्ता कुठे सुरु झाली आहे. भविष्यात AI आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग होणार आहे. स्वयंचलित वाहनं सर्वत्र दिसतील, तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार शिक्षण आणि वैद्यकीय सेवा सर्वसामान्य होईल आणि रोबोट्स आपल्यासोबत सहकारी म्हणून काम करतील. यामुळे आपला वेळ आणि श्रम बचत होईल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपले जीवन सुखदायी बनण्यास मदत होईल.

    तसेच, AI चा वापर योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर झाला तर मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ शकते, काही प्रमाणात बेकारी वाढू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. जसे की AI तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनिअर इत्यादी. पण दुसरीकडे काही नोकऱ्या संपुष्टातही येऊ शकतात. जसे की कॉल सेंटरमधील ऑपरेटर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स इत्यादी. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे आणि नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे.

    artificial intelligence 1680769373

    भविष्यात काय करायचं?:

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन ते आपल्या कल्याणासाठी वापरली पाहिजेत. यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत:

    शिक्षण आणि प्रशिक्षण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आणखी संशोधन आणि विकास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजाला या तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवणेही गरजेचे आहे.
    नियमन: AIचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे आणि नियमावली तयार करणे गरजेचे आहे.
    नैतिकता: AI तयार करताना आणि वापरताना नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे.

    आपण जर जबाबदारीने आणि सुबुद्धीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते मानवाच्या प्रगतीचं आणि कल्याणाचं एक शक्तिशाली साधन ठरू शकते. ते मानवापेक्षा हुशार होईल का? ही चर्चा अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की, AI आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या नशिबाचा खेळ खेळवणार की आपल्या मदतगार ठरणार हे आपल्या हातातच आहे. म्हणून आपण या क्षेत्रात झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेऊन त्याचा सावधपणे आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे.

  • औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

    औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

    या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील दुघाळा परिसरातील जागा अधोरेखित करण्यात आली, तेथे फारशी झाडे नाहीत. सुमारे १७४ एकर जागा महाप्रकल्पासाठी अधिग्रहित करून प्रशासकीय इमारतही उभी राहिली. मात्र, सन २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे प्रकल्पाची अंतिम मंजुरी लांबत गेली. अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे. सध्या केवळ अमेरिकेतील वॉशिंग्टन व लुईझियानामध्ये या प्रयोगशाळा आहेत.

    India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

    लायगो वेधशाळेने २०१६ साली दोन मोठ्या कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरूत्वीय लहरींचा पहिल्यांदाच शोध लावला होता. या संशोधनाला २०१७ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. जेव्हा ही वेधशाळा २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. त्याचे व्यवस्थापन ‘आयुका’कडे असेल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. भविष्यात वेध घेतल्या जाणाऱ्या गुरूत्वीय लहरींचे मुळ शोधण्यासाठी या नवीन अत्याधुनिक वेधशाळेची मदत होणार आहे. लहरींच्या संशोधनासाठी उच्च कौशल्याची गरज असते. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधकांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देता येणार आहे.

    दुघाळा परिसरामध्ये उभारली जाणारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये १२१ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या प्रयोगात गांधीनगरची प्लाझ्मा संशोधन संस्था, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिक केंद्र (आयुका), इंदोरचे राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र या संस्थांची भूमिका लायगो इंडिया प्रकल्पात महत्त्वाची ठरणार आहे. लायगो

    LIGO 1068x601 1

    ११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी लायगो (Laser Interfrometer Gravitaional Wave Observatroy)चे कार्यकारी संचालक प्रो. डेविड रिट्झ यांनी गुरुत्त्वीय लहरी सापडल्याची घोषणा केली आणि आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अजून एकदा प्रबळ पुष्टी मिळाली. १९१६ साली आइन्स्टाइन यांनी या लहरी अस्तित्त्वात असाव्यात असे भाकीत त्यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या (General Relativiry) सिद्धांताच्या आधारे केले होते. त्याचा भक्कम पुरावा लायगो प्रकल्पामुळे मिळाला आहे. या गुरुत्त्वीय लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण असल्याकारणाने त्यांचा शोध हा अतिशय अवघड, किचकट पण महत्त्वपूर्ण मुद्दा असतो. पण या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एलएससीच्या (LIGO scientific collaboration) एक हजारांहून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा सहभाग होता. गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता. संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली. भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

    India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

    वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असलेल्या लायगो प्रयोगशाळांमधून २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा शोधला गेला. त्यावेळी लायगोने पकडलेल्या गुरुत्वीय लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात लायगो प्रयोगशाळांना यश आले होते. दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या या गुरुत्वीय लहरी होत्या. विशेष म्हणजे ही घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती. वॉशिंग्टन व लुईझियाना येथील प्रयोगशाळांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात.

  • १००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांची आज जयंती… विनम्र अभिवादन

    १००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांची आज जयंती… विनम्र अभिवादन

    unnamed 1
    Thomas edison 1

    १८८९ साली पॅरिसमधे एका विशाल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दोनपैकी एका पूर्ण भागात फक्त एकाच माणसाच्या संशोधनाने मंडप व्यापून टाकला होता ती थोर व्यक्ती म्हणजे, ‘थॉमस अल्वा एडिसन’. या वैज्ञानिकाला पॅरिसला सादर आमंत्रित केले होते आणि त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ११ फेब्रुवारी १८४७ हा जन्मदिवस आहे त्याचा….

    वयाच्या १० व्या वर्षीच एडिसनने घरातील कोठारात एक प्रयोगशाळा थाटली. पैसे कमी पडू लागले म्हणून याने ग्रँड ट्रंक रेल्वेच्या धावणार्‍या आगगाडीत वर्तमानपत्र व चॉकलेट विकावयास सुरुवात केली. एके दिवशी धावपळीत आगगाडी सुटली. गाडी पकडण्याच्या प्रयत्न असलेल्या एडिसनच्या दोन्ही हातात वस्तू होत्या, म्हणून एका सहप्रवाशाने त्याचा एक कान धरून त्याला गाडीत ओढले. या धडपडीत त्याचा एक कान निकामी झाला. पण याच एका वर्षाच्या कालावधीत एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत एक सर्वसाधारण टेलिग्राफ मशीन निर्माण करण्यात यश संपादन केलं होतं.

    १८६२ मधे एडिसनला एक लहान मुलगा रुळावर खेळताना आढळला. आपला जीव धोक्यात घालून एडिसनने त्याला वाचवले. त्यामुळे स्टेशनमास्तर असलेले त्या मुलाचे वडील खुश झाले आणि बक्षीस म्हणून त्यांनी एडिसनला टेलिग्राफी शिकविली. १८६८ उजाडताच एडिसनने आपले पहिले टेलिग्राफ तयार करून आपले पहिले पेटेंट मिळविले. आपलं टेलिग्राफ उपकरण त्याने एक्सचेंजच्या अध्यक्षाला या अपेक्षेने विकले की, त्याला २,००० डॉलर तरी मिळतील. एक्सचेंजच्या अध्यक्षाला ते टेलिग्राफमशीन इतके भावले की, त्यांनी एडिसनला या टेलिग्राफ मशीनचे ४०,००० डॉलर दिले. ही घटना एडिसनला एका निर्णायक दिशेने घेऊन जाण्यात कारणीभूत ठरली.

    thomas edison sixteen nine 1

    बॅटरी तयार करण्याच्या प्रयत्नात त्याचे ८००० प्रयोग फसले. एकाने त्यांना म्हटले ‘‘विनाकारण वेळ गेला हे ८००० प्रयोग करण्यात!’’ एडिसनने उत्तर दिले, ‘‘अरे मला ८००० शोध लागलेत की या पदार्थांच्या संयोगाने चांगली बॅटरी बनू शकत नाही.’’ याला म्हणतात शोधकर्ता!

    thomas alva edison

    कधी कधी महान शास्त्रज्ञसुद्धा अगदी बालिशपणे वागतात. कोणे एकेकाळी दिलीपकुमार श्रेष्ठ की अभिताभ बच्चन श्रेष्ठ,असा वाद त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असे. हा वाद तसा आजही सुरू आहे. पण त्यात आणखी दोन-चार अभिनेत्यांच्या नावांची भर पडलेली आहे. एडिसन व टेस्ला यांच्या चाहत्यांतसुद्धा हा अशा प्रकारचा वाद आजही सुरू आहे. कोण मोठा शास्त्रज्ञ आहे? एडिसन डायरेक्ट करंट (DC)चा खंदा समर्थक. परंतु टेस्ला अल्टर्नेट करंट (AC) तंत्रज्ञानावर दृढ विश्वास असणारा (आणि टेस्लाचच बरोबर होतं!).

    एडिसन व टेस्ला यांच्यात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. एडिसन हे ‘व्यावहारिक’ शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनाचा सारा कल या एकाच गोष्टीवर अवलंबून होता. ज्या शोधाचा उपयोग सर्वसामान्यांच्या मदतीसाठी होत नसेल व त्यातून कोणतीही अर्थप्राप्ती होत नसेल तर त्या शोधाकडे ते ढुंकूनही पाहत नसत. याच कारणास्तव ते शास्त्रज्ञ-व्यापारी किंवा धंदेवाईक शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. आपल्या कार्याची व्याप्ती वाढण्यासाठी व नवनवीन संशोधनाचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पदरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांची फार मोठी फौज जमा केली होती. हे सारे वेगवेगळय़ा प्रश्नांवर काम करत राहायचे व एखादा शोध लागला की, त्याचं पेटंट एडिसन यांच्या नावावर जमा व्हायचं.

    टेस्ला यांची ही विद्युत प्रणाली अधिक लोकप्रिय झाली तर त्यांना त्यांच्या एक दिशा विद्युत पद्धतीचा गाशा गुंडाळावा लागेल याची एडिसनना मनोमन खात्री पटली. त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याकारणानं टेस्ला यांची पद्धत कशी व किती धोकादायक आहे व या प्रणालीचा त्रास कशाप्रकारे होऊ शकेल हे दाखवून व पटवून देण्यासाठी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मुक्या जीवांना व प्राण्यांना ‘शॉक’ देऊन मारण्याचा उपद्व्याप सुरू केला. त्यांच्या या हीन कृत्यांतून अनेक कुत्रे, मांजरी, गाई, म्हशी, घोडे व एका हत्तिणीला हकनाक प्राण गमवावे लागले. ६ ऑगस्ट १८९० रोजी पहिल्यांदा एडिसनच्या आग्रहाखातर एका कैद्याला प्रत्यावर्ती करंटच्या साहाय्याने हाल हाल करून मारण्यात आले. एडिसनचा हा सारा खटाटोप स्वत:चे व्यापारी हित जोपासण्यासाठी होता. एवढे करूनही त्यांना हवा तो परिणाम साधता आला नाही. आज टेस्ला यांची प्रत्यावर्ती विद्युत प्रणाली सरस ठरलेली आहे. पुढे एडिसनला त्यांचे पूर्व सहयोगी टेस्ला सोबत नोबेल पारितोषिक मिळणार होतं, परंतु टेस्लाने एडिसनसोबत पारितोषिक घेण्यास नकार दिला आणि दोघेही नोबेलपासून वंचित राहिले.

    1520211616559

    आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शोध करण्याची मानसिकता ठेवणारा हा महान वैज्ञानिक अत्यंत मृदुभाषी होता. त्याचं खालील वाक्य त्याची नम्रता सांगून जाते.

    ‘‘माझ्या यशात विद्वत्तेची भूमिका १ टक्का आणि परिश्रमाची भूमिका ९९ टक्के आहे!’’ पण जर कोणी निकोला टेस्ला यांना हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी जिनियस म्हणजे नव्याण्णव टक्के स्फूर्ती व एक टक्का मेहनत असं उत्तर बहुधा दिलं असतं. अशा प्रकारची परस्परविरोधी उत्तरं थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला यांच्या अंगभूत गुणवैशिष्टय़ांना समर्पकपणे अधोरेखित करतात. ते दोघेही अतिशय महान वैज्ञानिक होते.

    संदर्भ :- शिरीष उऱ्हेकर यांचा एडिसनवरील लेख

  • तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा वीज यांसारख्या मूलभूत स्त्रोतांपर्यंत पोहोचता आलेलेच नाहीये. मात्र, यशस्वी व्यवसाय सुरू करताना समाजात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या अनेक टेक संस्थापकांसाठी जगाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदलणारे उपाय तयार करणे, हे सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. अशात, या लेखातून आपण अशा ५ समस्या पाहणार आहोत, ज्या तंत्रज्ञानाद्वारे लवकरात लवकर सोडवल्या जाऊ शकतात.

    १. भूकेचा प्रश्न मिटवणे

    जगभरात दोन वेळच्या जेवणासाठी लोक वणवण भटकताना दिसतात. खरं तर, प्रत्येकाला पुरेल इतके अन्न आहे, तरीही जवळपास एक अब्जाहून अधिक लोक दररोज रात्री उपाशी झोपतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जगात प्रचंड विषमता आहे. अनेक लोकांकडे अन्न पिकवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आवश्यक जमीन किंवा पुरेसे उत्पन्न नसते. तसेच, आनुवांशिक अभियांत्रिकी आणि शेती पद्धतीतील प्रगतीमुळे आपल्याला स्वस्त आणि कार्यक्षमतेने पिके वाढवता येतील. याचा अर्थ, प्रत्येकासाठी अधिक उपलब्ध आणि परवडणाऱ्या अन्नाचा स्त्रोत तयार होईल.

    Automation Farming

    २. असाध्य (Incurable) रोगावर तोडगा काढणे

    फक्त जीनोमिक्समुळे (जीनोमिक्स हे एक जैविक क्षेत्र आहे जे जीनोमची रचना, कार्य, उत्क्रांती, मॅपिंग आणि संपादन यांचा अभ्यास करते.) रोगाबद्दलची आपली समज विकसित होत नाहीये, तर आरोग्य सेवेच्या वितरणामुळेही पूर्ण बदल होत आहे. जीवशास्त्राची आपली समज जसजशी सुधारत जाईल, तसतशी आपली औषधे आणि रोग शोधण्याच्या आणि बरे करण्याच्या पद्धतीही वाढतील. जीनोमिक्सचे आपले ज्ञान सतत विकसित होत आहे, जसे की सर्वसाधारणपणे रोगांबद्दलची आपली समज आहे. पुरेशा प्रगतीमुळे, आपण लवकरच इबोला आणि मलेरिया यांसारख्या प्राणघातक रोगांचा नाश करणाऱ्या रोगांवर उपचार शोधू शकू.

    Technology Solving the incurable disease

    ३. स्वस्त आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे

    येत्या काळात आपल्याला नवीन औषधे मिळाली नाही, तरीही नवीन आरोग्यसेवा तंत्रज्ञानामुळे लोकांपर्यंत स्वस्त आणि परवडणारी औषधे पोहोचवण्यात मोठा प्रभाव पडेल. हेल्थकेअर इनोव्हेटर्स हेल्थकेअर गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. त्यामुळे आरोग्य क्रांती लवकरच पाहायला मिळू शकते. अशाप्रकारे आपण लवकरच आरोग्य निरीक्षण पद्धती आणि जुनाट आजार शोधण्याच्या नवीन पद्धतींमध्ये झेप घेऊ शकतो.

    Technology Providing cheap and affordable healthcare

    ४. सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे

    आधीच्या काळात शिक्षण घेणे खूपच कठीण होते. मात्र, आता इंटरनेटमुळे जास्तीत जास्त लोकांना उच्च शिक्षणापर्यंत मजल मारता येत आहे. विद्यार्थी केव्हाही स्वस्त, वैयक्तिक अभ्यासक्रमांमधून कुठेही शिकू शकतात. आता विद्यार्थ्यांना एका जागी बसून शिक्षणाचे चांगले वातावरण मिळते, यामुळे त्यांना उच्च पदवी आणि उत्तम शिक्षणाचा अनुभवही घेता येतो. वर्गातील तंत्रज्ञान (In-Classroom Technology) अपंग विद्यार्थी आणि पारंपारिक वर्गात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देते. विशेष म्हणजे, हे योग्य तंत्रज्ञानाशिवाय खूपच कठीण असते.

    Technology Providing quality education to all

    ५. प्रत्येकासाठी स्वस्त वीज निर्मिती करणे

    सध्या अक्षय ऊर्जेने वेग घेतला आहे. अलीकडेच, सौर ऊर्जा जगातील सर्वात स्वस्त ऊर्जा स्रोत बनली आहे. विकसनशील राष्ट्रांसाठी, जीवाश्म इंधनाला समर्थन देण्यासाठी महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वस्त, अक्षय ऊर्जेच्या पर्यायांसह जाणे अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. अक्षय ऊर्जा केवळ उत्पादनासाठी स्वस्तच नाही, तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगली आहे, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून ती एक चांगला पर्याय बनते.

    Technology Generating affordable electricity for everyone
  • गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 2WD, 4WD, AWD आणि RWD या नावांचा अर्थ माहितीये का?

    गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 2WD, 4WD, AWD आणि RWD या नावांचा अर्थ माहितीये का?

    कुठल्याही कठीण रस्त्यावर सहजरीत्या चालू शकतील, अशा या कार असतात. मात्र, कठीण रस्त्यांना सोपे करण्यासाठी कार्समध्ये अनेक प्रकारचे फिचर्स दिलेले असतात. यापैकीच एक फिचर म्हणजे 4×4 होय. परंतु, अलीकडच्या काळात तुम्ही गाड्यांसाठी 2WD (2 व्हील ड्राईव्ह), 4WD (4 व्हील ड्राईव्ह), AWD (ऑल व्हील ड्राईव्ह), RWD (रियर व्हील ड्राईव्ह) आणि अशी बरीच नावे वापरताना ऐकली असतील. अशात, अनेकांचा गोंधळ उडतो की, या सर्वांमध्ये नेमकं अंतर आहे तरी काय. हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

    The Difference Between Drivetrains

    गाड्यांमध्ये जी पॉवर आहे ती इंजिनद्वारे तयार होते, हे तर आपल्याला माहितीच आहे. ही पॉवर ट्रान्समिशनला पाठवली जाते, जी गियर्सचा वापर करून एका ड्राईव्ह शाफ्टच्या मदतीने चाकांना पॉवर पाठवतात. FWD (फ्रंट व्हील ड्राईव्ह) गाड्यांमध्ये ही पॉवर पुढच्या टायर्सला जाते, तर मागील टायर्स हे फ्रीमध्ये (कोणत्याही पॉवरशिवाय) फिरतात. दुसरीकडे, RWD (रियर व्हील ड्राईव्ह)मध्ये ही पॉवर मागील चाकांना जाते आणि पुढचे चाकही फ्रीमध्ये फिरतात. तुम्ही अशाप्रकारे हे समजू शकता की, FWD मध्ये गाडीला समोरून ओढले जाते आणि RWD मध्ये गाडीला मागून धक्का देऊन ढकलले जाते.

    याव्यतिरिक्त AWD गाड्यांमध्ये पॉवर चारही चाकांना जाते आणि एक कॉम्प्युटर ठरवतो की, केव्हा कोणत्या चाकाला किती पॉवर मिळते. 4×4 म्हणजेच फोर व्हील ड्राईव्ह कारमध्ये प्राथमिकरीत्या पॉवर मागील चाकांना जाते. मात्र, तुम्ही एका मेकॅनिकल लॉकच्या मदतीने तुम्ही 4×4ला एंगेज करू शकता, ज्यामुळे पुढील चाकांनाही पॉवर जाते. म्हणजेच, चारही चाकांना पॉवर मिळते.

    गाड्या वेगवेगळ्या ट्रेन्सवर चालतात. अधिकतर रस्त्यांवर, पण बर्फावर, टेकड्यांवर, चिखलात आणि एवढंच काय तर चंद्रावरही. अशात, प्रत्येक जागेच्या हिशोबाने एक ड्राईव्ह ट्रेन असतो, जो सर्वोत्तम असतो. जर त्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे तो ड्राईव्ह ट्रेन नसला, तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. चला तर, हेच आपण जाणून घेऊयात.

    FWD (फ्रंट व्हील ड्राईव्ह)

    FWD (फ्रंट व्हील ड्राईव्ह) ही सिस्टीम सर्वाधिक फायदेशीर आहे. कारण, अधिकतर गाड्यांमध्ये इंजिन आणि ट्रान्समिशन पुढेच असते. त्यामुळे तिथून पुढच्या चाकांना पॉवर देणे सर्वात सोपे आहे. अशाप्रकारे पॅकेजिंग, वजन आणि किंमतीनुसार, या गाड्या सर्वात सोयीस्कर आहेत. मात्र, इथे तुम्हाला एक तोटा असाही पाहायला मिळेल की, या गाड्यांमध्ये ग्रिप कमी असते. त्यामुळे खराब रस्त्यांवर जसे की, माती किंवा चिखलात या गाड्या योग्य नसल्याचे दिसते. खरं तर, समोरच्या चाकांचं काम हे गाडीला वळण घेण्यासाठी मदत करणे असते. त्यामुळे पॉवर आणि वळण याच चाकांना देत असल्याने गाडीला ग्रिप कमी मिळते. तुम्हाला दररोजच्या जीवनात ही समस्या उद्भवणार नाही, पण जेव्हा तुम्ही रेसिंग करत असाल, गाडीला स्पोर्ट कारप्रमाणे चालवत असाल किंवा कमी ग्रिप असलेल्या ठिकाणी चालवत असाल, तर तेव्हा तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल.

    Front Wheel Drivve

    RWD (रियर व्हील ड्राईव्ह)

    RWD (रियर व्हील ड्राईव्ह) गाड्या शौकिन लोकांच्या पसंतीच्या असतात. यामध्ये पॉवर इंजिन-ट्रान्समिशन-ड्राईव्ह शाफ्ट असा प्रवास करत मागील चाकांना जाते. त्यामुळेच हा ड्राईव्ह शाफ्ट खूप लांब असतो. हा सेटअप तुम्हाला अधिकतर स्पोर्ट्स कार्समध्ये पाहायला मिळेल. कारण जेव्हा गाडी एक्सलेरेट करते, तेव्हा वजन मागील बाजूस जाते. याने मागील चाकांवरील भार वाढेल आणि तुम्हाला ग्रिपही जास्त मिळेल. यावेळी पुढील चाक जे असतील, ते गाडीला दिशा देण्यासाठी फ्री असतील आणि तुम्हाला गाडी चालवतानाही चांगले वाटेल. भारतात या प्रकारात येणाऱ्या सामान्य गाड्यांमध्ये मारुती ओमनी, मारुती इको, महिंद्रा बोलेरो आणि आता महिंद्रा बोलेरो नियो यांचा समावेश आहे.

    Rear Wheel Drive

    4×4 (4 व्हील ड्राईव्ह)

    4×4 म्हणजेच 4 व्हील ड्राईव्ह. या गाड्यांमध्ये पॉवर सर्वाधिक मागील चाकांना जाते. मात्र, जेव्हा रस्ता खराब होतो आणि तुम्हाला गाडी चालवण्यात अडचण येते, तेव्हा तुमच्याकडे 4×4 निवडून पुढील चाकांनाही पॉवर पाठवण्याचा पर्याय असतो. अधिकतर गाड्यांमध्ये पॉवरची विभागणी 50-50 टक्के असते. ही लिंकिंग प्रक्रिया मेकॅनिकल असल्यामुळे, तुम्ही कोणत्या चाकाला किती पॉवर मिळतेय, याचे नियंत्रण करू शकत नाहीत. तसेच, वेगात गाडी चालवायची असेल आणि लांब रस्त्यांसाठीही तुम्ही 4×4 पर्याय वापरू शकत नाहीत. हा पर्याय फक्त तेव्हाच वापरला जाऊ शकतो, जिथे रस्ते खूपच खराब आहेत किंवा रस्तेच नाहीयेत. जसे की, टेकड्या, जंगल किंवा ऑफरोड रेसिंगमध्ये. तुम्ही अशा रस्त्यांवर चालवत असाल, तेव्हा चारही चाकांना पॉवर मिळत असल्यामुळे तुमची गाडी फसण्याची शक्यता खूपच कमी असते. ही सिस्टीम तुम्हाला महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांसारख्या कार्समध्ये पाहायला मिळते.

    Four Wheel Drive

    AWD (ऑल व्हील ड्राईव्ह)

    AWD आणि 4×4 गाड्यांमध्ये फक्त एकच फरक आहे, तो म्हणजेच कम्प्युटर चीपचा. जिथे 4×4 गाड्यांमध्ये ड्रायव्हरला स्वत: 4×4 सिस्टीम एंगेज करावी लागते, तर ऑल व्हील ड्राईव्ह गाड्यांमध्ये हा निर्णय कम्प्युटर घेतो. हा निर्णय एक कम्प्युटर घेत असल्यामुळे हे खूपच जलद असते. तसेच, कोणत्या चाकाला किती पॉवर मिळत आहे, ते मॅनेज केले जाऊ शकते. सामान्य शहरी कंडिशनमध्ये AWD गाड्या या FWD सिस्टीमने म्हणजेच पुढच्या चाकांवर चालतात. मात्र, जेव्हाही ग्रिप कमी मिळू लागते, जसे की, पाऊस, बर्फ किंवा माती आली, तर ट्रॅक्शन नियंत्रित करण्यासाठी चाकांना वेगवेगळ्या प्रकारे पॉवर दिली जाऊ शकते. त्यामुळे गाडीची स्टेबिलिटी आणि मोमेंटम चांगल्याप्रकारे हाताळली जाऊ शकते. ही सिस्टीम तुम्हाला महागड्या गाड्यांमध्ये पाहायला मिळेल. जसे की, जीप कंपस, स्कॉडा कोडियाक किंवा मग लँड रोव्हर एसयूव्हीज. या गाड्यांना बर्फात, मातीत किंवा चिखलाच्या रस्त्यावर या सिस्टीमचा फायदा मिळतो.

    All Wheel Drive
  • कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    >> डोकेदुखी

    कम्प्युटर आणि लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं मोठं कारण ठरतात. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. असे मानले जाते की, कम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश, पॅटर्न आणि चित्रांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सर्वात जास्त वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोकेदुखीची समस्या होते.

    >> मांसपेशींमध्ये समस्या

    एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, फार जास्त वेळ खुर्चीवर बसून कम्प्युटर काम करत राहिल्याने मांसपेशी थकतात. त्यामुळे मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यासोबतच पाय, छाती, खांदे आणि हात सुन्न होतात. कम्प्युटरवर अनेक तास सतत बसून राहिल्याने हे एक मोठं नुकसान होतं.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> डोळ्यांसाठी घातक

    कम्प्युटरवर काम करतेवेळी सतत स्क्रीनकडे बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, फार जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांना थकवा, खाज, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांना जड वाटणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अकाली कमजोर होते. खासकरुन लहान मुलांच्या डोळ्यांवर याचा फार वाईट प्रभाव पडतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> तणाव वाढतो

    फार जास्त वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटर स्क्रीनवर काम करणे तणाव वाढण्याचं मोठं कारण आहे. तासंतास कम्प्युटरवर काम केल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेत कमतरता येते. त्यांना सतत २४ तास हलकी डोकेदुखी होत राहते. नंतर अशी स्थिती येते की, व्यक्ती गंभीर स्ट्रेस, डिप्रेशन आणि वेगवेगळ्या मानसिक समस्यांनी ग्रस्त होतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> वजन वाढतं

    लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर जास्त वेळ करणे आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. मात्र कम्प्युटरचा अधिक वापर करणारे जवळपास ३० टक्के लोक वेगाने वजन वाढण्याच्या समस्येचे शिकार होत आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, कम्प्युटरचा अधिक वापर सर्वच वयोगटातील लोकांच्या, खासकरुन लहान मुला-मुलींच्या सुस्त आणि आळशी होण्याचं कारण आहे. त्यानंतर त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच डायबिटीज आणि हृदयरोगांचाही धोका वाढतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    Source : ऑनलाइन लोकमत

  • तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा वीज यांसारख्या मूलभूत स्त्रोतांपर्यंत पोहोचता आलेलेच नाहीये. मात्र, यशस्वी व्यवसाय सुरू करताना समाजात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या अनेक टेक संस्थापकांसाठी जगाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदलणारे उपाय तयार करणे, हे सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. अशात, या लेखातून आपण अशा ५ समस्या पाहणार आहोत, ज्या तंत्रज्ञानाद्वारे लवकरात लवकर सोडवल्या जाऊ शकतात.

    १. भूकेचा प्रश्न मिटवणे

    जगभरात दोन वेळच्या जेवणासाठी लोक वणवण भटकताना दिसतात. खरं तर, प्रत्येकाला पुरेल इतके अन्न आहे, तरीही जवळपास एक अब्जाहून अधिक लोक दररोज रात्री उपाशी झोपतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जगात प्रचंड विषमता आहे. अनेक लोकांकडे अन्न पिकवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आवश्यक जमीन किंवा पुरेसे उत्पन्न नसते. तसेच, आनुवांशिक अभियांत्रिकी आणि शेती पद्धतीतील प्रगतीमुळे आपल्याला स्वस्त आणि कार्यक्षमतेने पिके वाढवता येतील. याचा अर्थ, प्रत्येकासाठी अधिक उपलब्ध आणि परवडणाऱ्या अन्नाचा स्त्रोत तयार होईल.

    82cf04f1 c11c 44f7 844c 8495b14f36fd

    २. असाध्य (Incurable) रोगावर तोडगा काढणे

    फक्त जीनोमिक्समुळे (जीनोमिक्स हे एक जैविक क्षेत्र आहे जे जीनोमची रचना, कार्य, उत्क्रांती, मॅपिंग आणि संपादन यांचा अभ्यास करते.) रोगाबद्दलची आपली समज विकसित होत नाहीये, तर आरोग्य सेवेच्या वितरणामुळेही पूर्ण बदल होत आहे. जीवशास्त्राची आपली समज जसजशी सुधारत जाईल, तसतशी आपली औषधे आणि रोग शोधण्याच्या आणि बरे करण्याच्या पद्धतीही वाढतील. जीनोमिक्सचे आपले ज्ञान सतत विकसित होत आहे, जसे की सर्वसाधारणपणे रोगांबद्दलची आपली समज आहे. पुरेशा प्रगतीमुळे, आपण लवकरच इबोला आणि मलेरिया यांसारख्या प्राणघातक रोगांचा नाश करणाऱ्या रोगांवर उपचार शोधू शकू.

    5699be1f 8b6d 4dd0 8384 b843fc9a87d5

    ३. स्वस्त आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे

    येत्या काळात आपल्याला नवीन औषधे मिळाली नाही, तरीही नवीन आरोग्यसेवा तंत्रज्ञानामुळे लोकांपर्यंत स्वस्त आणि परवडणारी औषधे पोहोचवण्यात मोठा प्रभाव पडेल. हेल्थकेअर इनोव्हेटर्स हेल्थकेअर गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. त्यामुळे आरोग्य क्रांती लवकरच पाहायला मिळू शकते. अशाप्रकारे आपण लवकरच आरोग्य निरीक्षण पद्धती आणि जुनाट आजार शोधण्याच्या नवीन पद्धतींमध्ये झेप घेऊ शकतो.

    7c7a4c7e 9079 446f 9273 b70efd0198d2

    ४. सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे

    आधीच्या काळात शिक्षण घेणे खूपच कठीण होते. मात्र, आता इंटरनेटमुळे जास्तीत जास्त लोकांना उच्च शिक्षणापर्यंत मजल मारता येत आहे. विद्यार्थी केव्हाही स्वस्त, वैयक्तिक अभ्यासक्रमांमधून कुठेही शिकू शकतात. आता विद्यार्थ्यांना एका जागी बसून शिक्षणाचे चांगले वातावरण मिळते, यामुळे त्यांना उच्च पदवी आणि उत्तम शिक्षणाचा अनुभवही घेता येतो. वर्गातील तंत्रज्ञान (In-Classroom Technology) अपंग विद्यार्थी आणि पारंपारिक वर्गात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देते. विशेष म्हणजे, हे योग्य तंत्रज्ञानाशिवाय खूपच कठीण असते.

    7382270f 2aaf 4d48 9423 f8304935b331

    ५. प्रत्येकासाठी स्वस्त वीज निर्मिती करणे

    सध्या अक्षय ऊर्जेने वेग घेतला आहे. अलीकडेच, सौर ऊर्जा जगातील सर्वात स्वस्त ऊर्जा स्रोत बनली आहे. विकसनशील राष्ट्रांसाठी, जीवाश्म इंधनाला समर्थन देण्यासाठी महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वस्त, अक्षय ऊर्जेच्या पर्यायांसह जाणे अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. अक्षय ऊर्जा केवळ उत्पादनासाठी स्वस्तच नाही, तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगली आहे, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून ती एक चांगला पर्याय बनते.

    52762df0 84b4 45d9 9e63 d1910121b67c

  • हॅकर्सपासून वाचायचं य? मग या टिप्स करा फॉलो!

    हॅकर्सपासून वाचायचं​य? मग या टिप्स करा फॉलो!

    फेसबुक! जगातलं सर्वात लोकप्रिय समाज माध्यम. जगभरातील कोट्यावधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. आपल्यासारखे सर्वचजण मित्रांशी आणि कुटुंबीयांशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर करतात, पण एवढ्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर अकाउंट हॅक होण्याची शक्यतासुद्धा तेवढीच जास्त आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपण दिवसेंदिवस या समाज माध्यमांना वैयक्तिक माहिती पुरवतच असतो. कितीतरी खाजगी गोष्टी आपल्या या अकाउंटवरच असतात. त्यामुळे तुमचं फेसबुक अकाउंट सिक्युअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही सोप्या सिक्युरिटी टिप्सना फॉलो करुन तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित ठेवू शकता. त्या टिप्स कोणकोणत्या आहेत जाणून घेऊया.

    मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा:-

    How to Create a Strong Password

    Unknown Accounts वरून friend request accept करू नका:-

    आपण सगळीकडे ऐकतो, पाहतो की अनोळखी लिंक ओपन करायच्या नाहीत, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांच्या friend request देखील स्वीकारू नका, अशी शिफारस खुद्द फेसबुककडूनच केली जाते. Facebook च्या एका सर्व्हेनुसार असं लक्षात आलंय की जर तुम्ही Unknown Accounts वरून friend request accept करत असाल, तर तुमचं खातं हॅक होण्याची शक्यता जास्त असते

    संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका :-

    Account सुरक्षित ठेवताना घ्यायच्या काळजीमधील दुसरी टिप म्हणजे फेसबुक युजर्सनी त्यांना मिळालेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. विशेषत: जर तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांद्वारे ही लिंक आली असेल किंवा एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये रँडमली कोणी टाकली असेल तर अजिबात लिंक ओपन करु नका. अशावेळी त्या लिंकवर क्लिक करण्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं.

    protect yourself From hackers

    Two-factor authentication (2FA) active करा:-

    2FA हा फेसबुकवर असणारा ऑप्शन active करणं account सुरक्षेसाठी फार गरजेचं आहे. हे सुरु करण्यासाठी फेसबुकच्या सेटिंगमधील सिक्युरिटी ऑप्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. हे करत असताना तुम्हाला तुमचा registered Mail ID आणि Contact Number verify करावा लागेल. तर या option मुळे तुम्ही Facebook वर registered नसलेल्या डिव्हाइसवरून लॉग इन करताना तुम्हाला तुमच्या ओळखीचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. यामुळे जर कधी दुसऱ्या कोणी लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याचं notification सुद्धा येईल.