Category: उद्योजकता विजडम

  • फुकट वाटा, पण उधार नको

    फुकट वाटा, पण उधार नको

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे फुकट वाटा, पण उधार नको… करायची सुरवात?

    उधारी आणि व्यवसाय याचं नातं वेगळंच आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. उधार द्यायचं नाही, तर धंदा होत नाही आणि उधार दिलं तर वसूल होत नाही. उधारी देऊन नुकसान होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेलं काय वाईट? लोकांना फुकट वाटायला तुम्ही काय कुबेराचे नातेवाईक आहात का? उधारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता विकत घेता व चिंता ही चिता समान असते, जी माणसाला हळूहळू मारते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आपल्या हक्काचे, कामाचे पैसे दुसऱ्याकडे पडून आहेत, त्याचा वापर आपण करू शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट कोणती.   

    उधारीवर बाजारात खूप मजेशीर किस्से आहेत. “उधार एक जबरदस्त जादू है। हम उधार देंगे आज, तो कल आप गायब हो जाओगे।”, “उधार ८० साल के उपरवाले को मिलेगा, वो भी उनके माता पिता को पुछकर।”

    उधार दिल्याचे व्यवसायात फायदे आणि तोटे

    १) डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.

    २) तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू शकता.

    ३) उधार देऊन संबध बिघडण्यापेक्षा उधारी नाकारून बिघडलेले बरे.

    ४) माल नाही खपला तर तो दानधर्म करा, पुण्य तरी मिळेल; पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    ५) उधारीतून वाद म्हणजे विकतचे भांडण होऊ शकते.

    ६) उधारीमुळे बुद्धिमान, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आयुष्यातून बरबाद होतो.

    ७) उधारीपुढे नुकसान झाल्यास तुमचा चांगुलपणा तुम्हालाच भोवतो व जग तुम्हालाच खुळे समजते, तुम्ही फेल बिझनेसमन आहेत असा समज होतो.

    ९) माल नाही खपला तर तो दानधर्म करीन, पुण्य तरी मिळेल पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    प्रमाणाबाहेर उधारी म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू. “एक रूपयाच्या मार्जिनवर धंदा करेन, पण उधारीवर करणार नाही.” अशी खूणगाठ बांधा. उधारीची वही हा प्रकारच दुकानात ठेऊ नका. नंतर देतो, लिहून ठेवा; तसले काही नको. ‘माल ठेवा, पैसे असतील तेव्हा घेऊन जा.’ कोणाशी कितीही दुश्मनी असली तरी मृत्यूनंतर आपण त्यांच्या कार्यास जातो; पण उधार घेणारा कधीच येत नाही. उधारी माणसात इतके वाईट अंतर निर्माण करते.

    तुम्ही व्यवसाय करत असताना उधारीच्या समस्येला कसे हाताळता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आत्ताच  सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे करायची सुरवात?

    एका गावात एक व्यावसायिक कुटुंब होते. तिघे भाऊ, वडील मिळून इंजिनीअरिंग स्पेअर पार्टस, हॉटेल इत्यादी व्यवसाय करत होते. गेल्या ७ ते ८ वर्षात एक्सपोर्टमधून बराच फायदा कमविला. अंदाजे १ ते ३ कोटी रुपये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतविले. मुंबईजवळ काही अंतरावर रोडलगत २७ एकर शेतजमीन १८ लाख रुपये एकर दराने विकत घेतली. काही महिने प्रोजेक्टचे नियोजन करीत होते. नंतर त्यांनी ती शेतजमीन एनए करून घेतली. त्यावर व जमिनीतील अंतर्गत रस्ते हेक्टरच्या लेवलने केले, वृक्षारोपण इत्यादीसाठी अंदाजे एकरी सहा लाख खर्च आला. तो त्यांनी बँकेतून कर्ज काढून केला. प्रत्येकी २००० वर्गफुटाने प्लॉट प्रत्येकी १६ लाख दराने विक्रीस आणले व ३ बीएचके बंगलो ४० ते ५० लाख ह्या दरम्यान. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची विक्री त्यांनी सुरू केली. सुरुवातीचे काही प्लॉट खपल्यानंतर थोडे महिने विक्री बंद करून आलेले पैसे खर्च करून सर्व प्लॉटना लहान बाउंड्री हॉल, छोटे वूड हाऊस, आकर्षक एन्ट्रन्स लॉन प्रोजेक्टससाठी बनविली. खूप लहान व १५ गुंठे ओपन जागेत लॉन बनविले. प्रोजेक्ट अंतर्गत खूप छान वृक्ष लागवड केली. प्रोजेक्ट्सचे थ्रीडी प्रझेंटेशन तयार केले, पूर्ण प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचा आकर्षक व्हिडीओ बनविला व त्यांची पुणे, मुंबई आणि इतर चांगल्या ठिकाणी जाहिरातबाजी केली. पुढे काही महिन्यात प्रॉपर्टीचे दरही वाढले होते. प्लॉट, बंगलो बघायला येणाऱ्यासाठी आकर्षक वेटिंग रूम, छोटेसे छान ऑफिस, साईटवर माहिती देण्यासाठी एमबीए झालेल्या तरुणाची नियुक्ती केली.

    २७ एकर जमिनीपैकी एनए केल्यानंतर सुमारे २२ एकर जमीन विक्रीस उपलब्ध होती व प्रत्येकी २००० वर्गफुटाचे ४४० प्लॉट विक्रीस तयार होते. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे ४४० गुणिले २० लाख बरोबर आठ कोटी ऐंशी लाख इतक्या किंमतीचा होता. एनए करणे, अंतर्गत रस्ते, सजावट, बाउंड्री वॉल, गार्डनिंग, फलकहाऊस, प्लॅन, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, एजंटना देऊ केलेले ५% कमिशन, बँकेचे व्याज, कामगारांचा पगार इत्यादीवर १५ ते २०% खर्च त्यांनी केला होता. पाच ते सहा वर्षात हळूहळू करून सर्व प्लॉट विकले गेले. सुरुवातीचे काही प्लॉट १० लाखाने विकले व परत प्रत्येक सहा महिन्यात किंमत वाढत गेली, शेवटचे ३० ते ३५% प्लॉट २७ लाखाच्या दराने विकले गेले. सरासरी दर १८ लाखाचा राहिला. ज्या शेतकर्‍याने १८ लाख एकरी दर म्हणून जमीन विकली त्याला त्याच जमिनीला दोन गुंठ्याला १८ लाख दर केवळ ५-७ वर्षात होईल असा विचार केला नसेल.

    पैशातून पैसा कमविण्याचे हे एक उदाहरण खूप काही सांगत आहे. जमिनी विकून खायच्या की आपण उद्योजक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. जसे कस्तुरीमृगाला माहीत नसते की, आपल्याकडे अत्यंत किंमती कस्तुरी आहे, तसे शेतकर्‍यांनाही माहीत नाही आपल्या जमिनीचे भविष्यातले खरे मोल काय आहे. ज्यांनी जमिनी २० लाख प्रति एकराने विकल्या तेथे आज २० लाख गुंठ्याचा दर आहे व दुर्दैव त्या मुळ जमीन मालकाकडे एक गुंठा तेथे घेण्याची ऐपत नाही. कारण बाटली, गाडी, सोन्याची चेन, राजकारण यातच त्याचे सर्व पैसे संपले.

    पैशाने पैसा वाढवायचं तंत्र तुम्ही कधी अंमलात आणलाय का? आणलं असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचे नियोजन तुम्ही कसं केल? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा

    काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा 

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा…’ करायची सुरवात?

    रामलाल मिठाईवाले ४० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर मुंबईत आले. दुसर्‍याच्या दुकानात हलवाईचे काम करत करत स्वतःचा धंदा सुरू केला. आज मुंबईत ५ दुकाने, ४ फ्लॅट, गाड्या सर्व काही आहे. दोन मुलं त्यांना व्यवसायात हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी रामलाल याचं दुःखद निधन झालं. सांत्वन सभा पुढील रविवारी होती, त्यांच्या मोठ्या मुलाने व्हॉटसअपवर तसा निरोप सर्वांना दिला. त्यांचा लहान मुलगा काऊंटर सांभाळत होता, ग्राहकांची गर्दी होती. ख्रिसमसमुळे केक, मिठाईला चांगली मागणी होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ दुकानात गेले आणि म्हणाले, “बिपीनभाई पिताजी गुजर गये समजके बहुत दुःख हुआ.” तो म्हणाला; मेहमान मिलने के लिए घर मे आते रहते है, इसलिए बडा भाई घर पे है। ख्रिसमस का सीझन है, तो मै धंदा संभाल रहा हू। क्या करे शो मस्ट गो ऑन! सर जी, वो कंडोलन्स मीटिंग का मेसेज मिला क्या, हमारे समाजभवन मे है।” ते गृहस्थ म्हणाले, “हा मिल गया, चलता हूँ।”. तीन दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं, त्याचा परिणाम काऊंटरला अजिबात न जाणवू देता तो व्यवसाय चालवत होता.

    असे म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला हसता येत नाही त्या दिवशी दुकान उघडू नका. ज्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर हसू नसते, त्याच्या दुकानात आले की ग्राहकांना जाऊच नये असे वाटते. काऊंटर सेल्सचीसुद्धा एक विशिष्ट सायकॉलॉजी आहे. माल त्याच किंमतीचा, पण चांगल्या सेल्स मॅनेजमेंटमुळे काही दुकाने जोरदार चालतात.

    यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघडणारे व सगळ्यात शेवटी बंद होणारे दुकान तुमचेच हवे. देवाला सुगंधी अगरबत्ती, दिवा लावूनच काऊंटरची सुरवात करा. मद्यपान, मांसाहार केले असेल तर आंघोळ केल्याशिवाय काऊंटरला येऊ नका. गृहकलह, बायकोबरोबर भांडण, टेन्शन, आजार, तब्येत, कुणाचा मृत्यू किंवा काहीही असेल, तरी कोणत्याही परिस्थितीत त्याचा काऊंटरवर दिखावा व वाच्यता करू नका. खरंच काही अडचण असेल व तुम्हाला त्या दिवशी हसता येत नसेल, तर एकतर दुकान उघडू नका, नाहीतर तुम्ही काऊंटरला बसू नका.

    दुकानाचे सर्व शेल्फ गच्च भरलेले दाखवा व ठेवा. अर्धवट शेल्फ ग्राहकांवर अत्यंत बॅड इंम्प्रेशन टाकतात. नेहमी स्वच्छ कपडे घाला, शक्यतो पांढरे शुभ्र किंवा लाईट कलरचे शर्ट वापरा. काऊंटरवर नेहमी स्वच्छता ठेवा. दुकानातील कामगारसुध्दा नीटनेटके असावेत. गल्ल्यात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. सुट्टे नसले की उगीच प्रत्येक वेळी इकडे तिकडे पळू नका. ‘छुट्टा लेके आओ’ असे ग्राहकांना म्हणू नका. नाहीतर सुट्टे आणायला जातो आणि मालही तिकडेच खरेदी करतो, तुम्ही वाट पाहत बसणार कधी येतोय म्हणून. अशा लहान लहान गोष्टीचे बारीक लक्ष व नियोजन म्हणजे ‘काऊंटर सेल्स मॅनेजमेंट’ हे लक्षात ठेवा.

    तुमचे काउंटर सांभाळताना तुम्ही या गोष्टी पाळता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्टीचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; ज्याच्या खिशात पैसा तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा… करायची सुरुवात?

    एक अतिउत्तम जॅकेट शिवणारा व्यावसायिक होता, त्याला नेहमी प्रश्न पडायचा कि “माझे जॅकेट जेमतेम १२०० रुपयांना विकले जाते, पण अशाच दर्जाचे जॅकेट शोरूमला लोक ३००० रुपयांना विकत घेतात. असं का होत असेल? मला ती किंमत का मिळत नाही?” त्याची ही समस्या घेऊन तो व्यावसायिक सल्लागार कदमांकडं आला. तेव्हा कदमांनी त्याला मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगितली.

    एकदा नसरुद्दीन खूप सुंदर पगडी घालून राजवाड्यात गेला. राजाला त्याची पगडी आवडली. राजा म्हणाला, “किती रुपयांत पगडी?” नसरुद्दीन म्हणाला, “१ हजार रुपयांना.”

    हे बोलणे तेथे असलेल्या व्यापाऱ्याने ऐकले व राजाला त्याने पगडी खूप महाग असल्याचे सांगितले.

    राजा म्हणाला, “पगडी खूप महाग आहे.” त्यावर नसरुद्दीन म्हणाला, “ही पगडी बनवायला किती खर्च आला आहे यावरच त्यांची किंमत ठरविली आहे व इतकी चांगली पगडी १ हजार रुपयांना केवळ राजाच घेवू शकतो, गोरगरीबांना ती परवडणारी नाही.”

    ह्या वाक्याने राजा खुश झाला व त्याने ताबडतोब १ हजार रुपये देऊन पगडी घेतली. बाहेर आल्यानंतर नसरुद्दीन त्या व्यापाऱ्याला म्हणाला, “तुला ह्या पगडीची किंमत माहीत असेल, पण राजाची प्रशंसा आणि त्याला खुश करण्याची किंमत काय मिळते, हे मला माहीत आहे.”

    मित्रहो, आपल्या उत्पादनाला जर चांगली किंमत मिळवायची असेल, तर आपले उत्पादन ज्याच्या खिशात पैसा आहे, त्यालाच विकण्याचा प्रयत्न करावा. दळभद्री लोकांच्या नादी लागू नये. तसेच कोणताही माणूस हा प्रशंसा व मानसन्मानाचा भुकेला असतो. त्यामुळे ग्राहकांची प्रशंसा करायला विसरू नये. तुमच्या उत्पादनाची किंमत ते तुम्ही कुणाला व कशा पद्धतीने विकता यावर अवलंबून आहे. जलद विचार करून ते आपले विचार दुसऱ्याच्या गळी उतरवता आले पाहिजे.

    तुम्ही तुमचे उत्पादन कशा प्रकारे विकता? उत्पादन विकताना काही ठराविक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करता का? करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो !’ करायची सुरवात?

    एका व्यापाऱ्याने बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना एक प्रश्न विचारला. मी संगमनेरवरून आहे. मी डाळिंब ट्रेडिंग व्यवसाय चालू केला. १५ ते १८% मार्जिन आहे. आता वर्ष झाले. धंदा होतोय पण पैसा कुठून आला व कुठे गेला कळतच नाही. बँकेचं कर्जही लाखांचे आहे. काहीच ताळमेळ लागेना, काय करावे?

    यावर कदम त्याला म्हणाले, “खर्च झाल्याचं दु:ख नाही, पण हिशोब लागत नाही याचं वाईट वाटतं.” नवीन व्यवसाय सुरू केल्यावर अनेकांचं असंच होतं. हातात अचानक पैसा खेळायला लागतो. पूर्वी कटिंग चहा पिणारा पण, हॉटेलात बसून सहज ५०० रुपये खर्च करतो. मुलांना १०० ऐवजी ५००चे खेळणे घेतो. इकडे तिकडे वायफळ पैसे खर्च होत राहतात. शेवटी इकडची तिकडची उधारी, बंकेचं कर्ज असं सगळं वाढत जात. बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे तोपर्यंत काही वाटत नाही, राहणीमान आपोआप उच्च होत राहतं, खर्च होत राहतो.

    बिझनेसमधले पैसे व वैयक्तिक वापराचे पैसे यातील फरक तोटा झाल्यावर कळतो. दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजारांपैकी आपले ५००च आहेत हे समजायला नवख्या व्यावसायिकाला वेळ लागतो, तोपर्यंत ५-१० लाख तोटा झालेला असतो. हिशोब म्हणजेच अकाऊंटिंग हा कोणत्याही व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे बरेच व्यावसायिक दुर्लक्ष करतात. व्यवसायाची सुरुवात सकाळी अकाऊंटची वही उघडून व सायंकाळी दुकान बंद करताना दिवसभरचा ताळेबंद मांडूनच व्हायला हवी, नाहीतर वर्षाच्या शेवटी डोळे उघडून काही उपयोग नाही. ह्याचे एवढे येणे बाकी व त्याचे तेवढे देणे बाकी. गल्ल्यात ठणठण गोपाळ आणि वहीत लाखोंचा फायदा अशी गत. हिशोबाची वही काय फक्त पुजण्यासाठी घेतली का? पैशाचा हिशोब रोजच्या रोज हवा व त्याचं रोजचं नियंत्रण हवे, अन्यथा नुकसान होऊन पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही.

    Behind every good Business, there is a great accountant. यशस्वी व कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, जिला आपण संसाराची ‘अर्थमंत्री’ म्हणतो. म्हणजेच ती चांगली accountant असते. महिना तीन किलो तेल, पाच किलो साखर लागते, तर त्यातच बरोबर घर चालविते आणि असेच घर पुढे जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हिशोब ठेवलात तर लागेल, नाहीतर फक्त पश्चाताप करावा लागेल.

    तुम्ही रोजचा हिशोब ठेवताय ना? हिशोब न ठेवण्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आहेत? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; बिल गेट्स का म्हणतात, ‘शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक! करायची का सुरुवात?’

    अमेरिकेतल्या एका भाषणात बिल गेट्स यांनी हा किस्सा सांगितला होता. स्वतःच्याच भयंकर वाईट सवयीचा. ते सांगतात की, मी काम चांगलं करायचो, पण सगळी कामं शेवटच्या मिनिटार्पयत तंगवून ठेवायचो. वेळ संपत आली, की मग धावतपळत काम करायचो. माझं काम चांगलं व्हायचं, पण त्या कामाचा मला आनंद होत नसे. दुसरं म्हणजे कुणीही त्या कामाचं काही कौतुक करीत नसे. मग वाटायचं की, हे काय, आपण इतकं काम करतो, चांगलं करतो तरी कुणाला त्याचं काही विशेष वाटत नाही. हा खेद एकीकडे आणि दुसरीकडे ते काम करताना येणारा ताण, काम चांगलं करण्यापेक्षा ते वेळेत करण्याचंच टेन्शन मग वाढत जायचं. इतकं वाढायचं की, काम पूर्ण झाल्यावर सुटलो एकदाचा असं वाटायचं.

    नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं, की आपल्याला ही वाईट सवय सोडावी लागेल. आपल्याला काम करायचं असतं, ते आपल्याला आवडतं, जमतंही. मग शेवटच्या क्षणापर्यंत ते काम टोलवत कशाला राहायचं? मग प्रयत्न करून मी ती सवय मोडली.

    हीच गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत तंतोतंत खरी असते. आपण कामचुकार नसतो, काम टाळतही नसतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावतपळत कसंबसं ते पूर्ण करतो.

    ही सवय तोडण्याचंही अवघड काम जमवलं तर जमू शकतं. ते कसं जमेल याचं उत्तरही, बिल गेट्सच देतात.

    ते म्हणतात, की सकाळी फक्त 15 मिनिटं मी कागद, पेन घेऊन बसायला लागलो. जी कामं त्या दिवशी होणं गरजेचीच आहे, ती आधी करतो. मग बाकीची. ऐनवेळी दुसरं कितीही तातडीचं काम आलं तरी, जे आधी करायचं काम असतं, त्याला वेळ देतोच. हळूहळू हे प्लॅनिंग जमतं.

    जे त्यांना जमलं ते आपल्यालाही जमू शकेल. मुद्दा इतकाच की, आपण ते करणार का? की अगदी आपल्या करिअरच्या, यशाच्या जिवावर बेतेल इतपत उशीर होईर्पयत ही सवय लांबवत नेणार? यावर तुमचं मत काय आम्हाला कॉमेंट नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपण गधा मजुरी तर करत नाही ना?’ करायची सुरवात?

    बँकेचे २० लाखांचे कर्ज काढले, महिना ३० हजार हप्ता… दुकान भाड्याने घेतले… ४ कामगार ठेवले, त्यांचा पगार ३० हजार रुपये… सर्व प्रकारचे कर महिना जवळपास १० हजार… वीजबिल, प्रवास इत्यादी किरकोळ खर्च ५ ते १० हजार… ईएमआयवर फ्लॅट व गाडी घेतली आहे, त्याचा हप्ता महिना १५ हजार जातो… शेवटी व्यवसायातून स्वतःसाठी व घरखर्चासाठी राहतात फक्त काही हजार रुपये… अशीच आहे आज असंख्य व्यावसायिकांची स्थिती… यालाच म्हणतात गधा मजुरी! व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी करतो की इतरांना पैसे वाटण्यासाठी हेच कळत नाही. वैयक्तिक जेवढा फायदा कमावता, त्यापेक्षा जास्त बँकेचे व्याज देता, दुकानाचे भाडे त्यापेक्षा जास्त देता, कामगारांना पगार त्यापेक्षा जास्त देता, असे का होते?

    याची काही मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे मार्केट साईज व ट्रेंडचा विचार न करता भला मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो, नंतर म्हणावा तेवढा व्यवसाय होत नाही, त्यामुळे आता करायचं काय, बंदही करता येत नाही व जोरातही चालत नाही. स्वतःचं मन स्वत:ला सतत खात असतं. वरुन दिसणारे कित्येक मोठे व्यावसायिक ह्यामुळे आतून दु:खी असतात. दुसरे म्हणजे मार्केटिंग, ब्रॅंडिंग व व्यवस्थापनात कमी पडलेले असतात. दुकान किंवा नवीन व्यवसाय टाकला म्हणजे ग्राहक लगेच उद्यापासून आपल्या दुकानात येऊ लागतील असं होत नसतं राजाहो…! ज्यांच्याकडे शंभर फुटसुध्दा दुकान नाही, ते लाखो करोडोचा व्यवसाय करत आहेत तर ज्यांची करोडोची दुकाने, लाखोंचे फर्निचर केले आहे ते सध्या माशा मारत बसले आहेत. त्यामुळे व्यवसायात उतरताना मागचा पुढचा विचार करूनच उतरा. सुरुवातीलाच लगेच  अनावश्यक खर्च ओढवून घेऊ नका. नाहीतर सगळी कमाई त्यातच जाईल. एवढी मेहनत करूनसुद्धा हातात काहीच राहणार नाही.

    तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाचं नियोजन कसं करताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!

    लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!

    तुम्हाला एका यशस्वी व सुप्रसिध्द ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक म्हणून करियर घडवायचे आहे का? स्वत:च्या फ्रँचायझी व्यवसायाचे मालक असण्याचे फायदे आपण समजून घेतले आहेत. परंतु योग्य फ्रँचायझी निवडण्यापूर्वी एखादी फ्रँचायझी संधी आपल्यासाठी परिपूर्ण आहे याबाबत तुमचे हदय व मेंदू पूर्णत: तयार आहे का? अर्थातच हा निर्णय तुमच्या भावनेवर नव्हे तर तर्कवादावर आधारित असावा.

    आपले डोके वापरा, मन आपोआपच साथ देईल.

    आपल्यासाठी कोणती फ्रँचायझी सुयोग्य व परिपूर्ण आहे, हे ठरवण्यापूर्वी आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत व आपली उद्दिष्टे काय आहेत याचा विचार करण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. त्यासाठी आपली उद्दिष्टे, स्वप्ने व इच्छित जीवनशैली याबाबत स्वत:ला प्रश्न विचारा.

    एका माणसाला क्रिकेटचे फार वेड होते. क्रिकेटविषयी तो फारच भावनिक होता. याचे तीव्र भावनेतून त्याने खेळाच्या साहित्याचे दुकान सुरू केले. परंतु लवकरच त्याची फसगत झाली. क्रिकेटची तीव्र आवड असूनही त्याचे दुकान काही महिन्यांत बंद झाले. कारण त्यांच्याकडे एक दुकानदार म्हणून, एक व्यापारी म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये व हुशारी नव्हती. फ्रँचायझी क्षेत्राबद्दल पॅशनेट असलेल्यांसाठी हा एक धडा आहे. तुमच्या निर्णय प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आवड किंवा छंद यांना प्राथमिकता देऊ नका. व्यवसायिक निर्णय घेताना ते भावनात्मक नसावेत, ते तर्कशुध्द असावेत. एका विशिष्ट फ्रँचायझीच्या यशासाठी तुमचे कौशल्य व तुमच्यातील उपजत बुध्दीमत्ता हे दोन घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यवसायात तीव्र पॅशनसोबतच लीडरशीप कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. फ्रँचायझी सिस्टीमच्या एकूण उद्दीष्टांबद्दल तुम्ही नेहमीच पॅशनेट व उत्साहित असले पाहिजे.

    परंतु आपण योग्य निर्णय घेत असल्याचे कसे सुनिश्चित करू शकता? तुम्ही योग्य लोकांशी सल्ला मसलत केले पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. एका संशोधनानुसार अनेक व्यवसायिक केवळ प्रॉडक्टची जाहिरात आवडल्याने फ्रँचायझी विकत घेतात व व्यवसाय सुरू करतात. ही भावना नैसर्गिक असली तरी केवळ भावनात्मक निर्णय घेऊन व्यवसाय सुरू करणे हा तर्कसंगत मार्ग नाही. यामुळे आपण अडचणीत येऊ शकता. एखादी फ्रँचायझी संधीसाठी आपल्या भावना तीव्र असतील किंवा एखाद्या फ्रँचायझी संधीने आपणास भावनिक अपील केले असेल तर ते तुमचे अंतिम लक्ष्य साध्य करण्यास तुमची मदत करेल याची खात्री करा किंवा तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास योग्य आहे का, हे तपासून पहा. बरेच व्यवसायिक तर्कशुध्द विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन फ्रँचायझी विकत घेतात व नंतर अपयशी होतात.

    काही व्यवसायिक अजून एक चूक करतात. केवळ एखादे उत्पादन किंवा सेवा उदा. पिझ्झा, केकची आवड आहे म्हणून पिझ्झा स्टोअर किंवा केक शॉपची फ्रँचायझी घेतात. या लॉजिक मध्ये गुणवत्तेला व कौशल्यांचे मूल्य शून्य असते. कारण या फ्रँचायझी निवडीमध्ये केवळ आपली आवड हा एकमेव आधार असतो आणि तो नसावा. तुम्ही या व्यवसायात स्वत:ला कसे गुंतवू इच्छिता. एक फ्रँचायझी ऑपरेटर/मालक म्हणून की एक अबसेन्टी ओनर म्हणून? तसेच फ्रँचायझी सपोर्ट सिस्टीम, कॉर्पोरेट स्टाफ आणि गुंतवणूक याबाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे. केवळ भावनिक निर्णय घेऊन बिझनेस सुरू केल्यास एक सक्षम लीडर म्हणून पुढील वाटचालही आव्हानात्मक असते. ही आव्हाने योग्य रीतीने न हाताळता आल्यास अपयश पदरी पडते.

    वरील सर्व गोष्टी पडताळून तसेच तर्क शुध्द विचार करून आपले उद्दिष्टे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी परिपूर्ण फ्रँचायझी कोणती आहे याबाबत निर्णय घेतल्या नंतरच तुमच्या संकल्पना वास्तवात उतरतील. एका नामवंत व यशस्वी ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक होणे ही स्वप्नवत व रोमांचक गोष्ट आहे. परंतु भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुध्द पध्दतीने विचारपूर्वक व्यवसाय चालवला तर तुम्ही आत्मविश्वासाने यश प्राप्त करू शकता. कारण फक्त तीव्र भावनांनी यश संपादन करता येत नसते, त्यासाठी ज्ञान, कौशल्ये, स्थिर लक्ष्य व तर्कशुध्द विचारशक्ती आवश्यक असते.

  • “अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…

    “अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…

    कष्ट करा, जोखीम उचला, ध्येये बाळगा…

    उद्योग करा, पैसा कमवा…!!!”

    एकदा एका दुकानदाराने ज्योतिष्याला विचारले की, “माझे दुकान चालत नाही, काय करू?” ज्योतिषी म्हणाला,”ही घे घोड्याची नाल, फक्त ५००० रुपयांना. दुकानावर लाव, मग बघ. दुकान चांगले चालेल.” दुकानदाराने थोडा विचार केला. नाल घोड्याची आहे मग आपण घोड्यालाच विचारले तर? मग तो घोड्याकडे गेला आणि त्याला विचारले,”तुझी नाल दुकानाला लावल्याने माझे दुकान चालेल का?” घोडा हसला आणि म्हणाला,”अरे बाबा, नाल लावून पैसा मिळत असेल तर मी कशाला दिवसभर टांगा ओढला असता? नाल हे प्रतीक आहे, घोड्यासारखं वेगवे धावत पळत राहण्याचं, काम करण्याचं.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नव्हता.” कोणत्याही निष्पाप प्राण्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून मंदीरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… देवावर श्रद्धा असूनही महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांना कुठल्याही देवाचे नाव दिले नाही, गणपतीचे सुद्धा नाही… अंधश्रद्धेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. शिवराय कुठेही लिंबू-मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव-देवस्की करत बसले नाहीत. ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले… कोणताही गड जिंकल्यावर तिथे कधीच सत्यनारायण घातला नाही… अमावस्या अशुभ मानली जाते. काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेण्यासाठी ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. शहाजीराजेंच्या मृत्युनंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. तर त्यांच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या. महाराजांचा स्वतःवर, स्वतःच्या बुद्धीवर व मनगटावर पूर्ण विश्वास होता… रायगडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवल्याशिवाय परत पाठवायचे नाही, हा नियम….

    हे वाचल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार नाही, परंतु तुमच्या विचारात आणि जीवनात सकारात्मक बदल करू शकतात… मी आशा करतो की हा लेख वाचून समाजात अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी प्रबोधन होईंल, लोकं अंधश्रद्धा सोडून स्वावलंबी बनतील आणि खऱ्या श्रद्धेतून उघड्या डोळ्याने सत्य पाहतील. मी बऱ्याच लोकांना पहिले आहे की त्यांनी यशासाठी किंवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग अवलंबला आणि बरबाद झाले. असे तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या बाबतीत होऊ नये हीच माझी भावना आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कोणताही मोठा निर्णय घेताना एकट्याने निर्णय घेऊ नका. चर्चा होणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांशी चर्चा करा, सल्ला घ्या. तर्कशास्त्र सांगणार्‍या गोष्टी स्वीकारा आणि आपण स्वतःला व इतरांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम रहा. देव माझ्यासाठी अस्तित्वात आहे. पण ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरेचजण नकली ज्योतिष्यांकडे जाऊन फसताना मी पहिले आहे. मी या गोष्टीला विरोध करीत नाही परंतु आपले भविष्य सांगणारे लोकसुद्धा काही मोठे विचारवंत नाहीत, जर त्यांना खरोखर काय घडणार आहे हे माहित असते तर त्यांचे स्वतःचे जीवन वेगळे असते. कोणतीही ग्रहांची हालचाल किंवा स्थिती काय होणार आहे, ते ज्योतिषी ठरवू शकत नाही. आपली स्वतःची उर्जा, आपले विचार आणि आपले व्हाइब आपले जीवन बदलू शेतात. आज बाजारात बरेच लोक अंगठ्या आणि रंगीत खडे विकण्याचे धंदे करतात. पण तुमचे आयुष्य कोणतेही अंगठी किंवा खडा बदलू शकणार नाही, ते तुम्हीच बदलू शकाल. मूळ किंवा आधार नसलेल्या अंधश्रद्धांसाठी बळी पडण्याऐवजी आपल्याला आपल्या जीवनात जी ध्येये आणि लक्ष्ये आहेत त्यासाठी उघड्या डोळ्यांनी लढा देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला लक्षाधीश व्हायचे आहे, जर आपण कठोर परिश्रम केले तरच..

    आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्याची तुमची इच्छा आहे, पण जर तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहून तिच्यासाठी जगाशी लढा देत असाल तरच… फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. संकटकाळात, अडचणींत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपयश आल्यास स्वतःला दोषी समजण्यात आणि एकटेपणात आपला आपल्याच निर्णयावर विश्वास नसतो; म्हणून लोक केवळ ज्योतिष्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीवर निर्णय घेतात. भविष्यवाणी क्वचितच खरी ठरते; परंतु या नादात ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, त्या गोष्टींवरच आपले लक्ष केंद्रित केले जाते. भविष्य सांगणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल किंवा आपल्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसते. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे थांबवा. लक्षात ठेवा, जगाचा विनाश होणार असा खूप वेळा दावा केला गेला होता, परंतु तसे झाले का कधी? आणि होणारही नाही हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. शहाणपणाने आणि तार्किकदृष्ट्या विचार करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

    Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

    Live and let live भगवान महावीरांच्या शिकवणीचा हा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो पुढे अनेक संताच्या आचरणात व लेखनात सापडतो. संत तुकाराम त्यांच्या शेतामध्ये ज्वारीची राखण करायचे तेव्हा चिमण्यांनी दाणे खाल्यानंतर त्यांना पिण्यासाठी मडकी भरून पाणी शेतात ठेवायचे. तोच मार्ग पुढे मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडनी अवलंबला. बिल गेट्स यांनी आतापर्यंत ९० अब्ज डॉलरचे दान विविध समाजजोपयोगी उपक्रमांना दिले.

    कायद्याने CSR (Corporate Social Responsibility) फायद्याच्या २-३% रक्कम अशा सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पिकावर येणारे पाखरे, चिमण्या, फुलपाखरू इत्यादी १ ते २% धान्य खातील पण त्यामुळे परागीभवन होऊन पिकांचे उत्पन्नही वाढायचे, पण जेव्हापासून कीटकनाशके, फवारणी सुरू झाले व त्याचा अतिरेक झाला. तेव्हा कोणतेच पीक औषध फवारलेशिवाय येईना मग पराग संचयन करणार कोण? कीटकांची संख्या कमी झाली, खर्च वाढू लागला व उत्पन्न घटू लागले. आपण दुसऱ्यांना जगू नाही दिले तर आपण ही जगू शकत नाही हे भगवान महावीर, संत तुकाराम यांनी सांगितले. सगळंच १००% मीच खाणार, माझं एकट्याच राज्य असणार याला दुर्योधन प्रवृत्ती म्हणतात. ज्याने पांडवांना काही गाव तर सोडाच, पण सुईच्या टोकावर इतकी पण जमीन देण्यास नकार दिला त्यामुळेच महाभारत घडले.

    मोठी कार कंपनी अनेक लहान उद्योगांना स्पेअर पार्ट बनवायचे कॉंन्ट्रॅक्ट देते. कारण तेथे अनेक कामगारांना काम मिळते व त्यांचीही कामे सोपी होतात. जगात कोणतेही काम, उद्योग सगळं मीच खाणार व सगळं मीच कमविणार या प्रवृत्तीने कधीच मोठा होत नाही व टिकतही नाही. ‘जिओ और जीने दो!’(Live and let live) ही प्रवृत्ती जोपासणारे मोठे होतात. आपल्या सोबत इतरांना, प्राण्यांना, पशूंना, झाडांना सांभाळा. ते तुम्हाला सांभाळतील व तुम्हाला मोठे करतील. मुंबईत ठिकठिकाणी सकाळी दुकान उघडण्या अगोदर कबुतरांना धान्य, गाईला चारा टाकताना अनेक व्यापारी बंधू तुम्हाला दिसतील. हे ‘जिओ और जीने दो!’ या तत्वातूनच येते.

    दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येकाला वाटत असते कि लोकांनी आपल्याशी सन्मानपूर्वक वर्तणूक केली पाहिजे, इतरांनी आपल्याला इज्जत, मानसन्मान द्यावा, आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी. परंतु त्यासाठी आपणसुद्धा इतरांचा सन्मान केला पाहिजे, इतरांच्याही भावनांची कदर केली पाहिजे. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे वर्तन करू नये. आपण इतरांना सुखी नाही करू शकलो तरी चालेल, परंतु आपल्यामुळे कोणी दुःखी होता काम नये याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आपण आणि भोवतालचा समाज यात सुसंवाद असेल तरच सामाजिक संतुलन अबाधित राहील.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी